कथेसाठी येथे क्लिक करा.
मंदिराच्या इतिहासासाठी येथे क्लिक करा.
फोटोंसाठी येथे क्लिक करा.
देणगी साठी येथे क्लिक करा.
वार्षिक उत्सवा साठी येथे क्लिक करा.
संपर्कासाठी येथे क्लिक करा.
श्री मार्तंड भैरव खंडोबा आणि देवी बानुबाई यांच्या लग्नाची संपूर्ण कथा…
श्री गणेशायनमः श्री मार्तंड भैरवायनमः
जि. नाशिक, ता. मालेगाव या तालुक्याच्या अग्नेय दिशास चार ते पाच किलोमीटर अंतरावर गिरणा नदी किनारी चंदनपूरी गांव त्या गावामध्ये समाजाचे श्री रेमगवाडा व खेमगावडा हे दोघे भाऊ राज्य करत होते. दोन्ही भावास संतती नव्हती. एके दिवशी दोन्ही भावांनी एकत्र बसून विचार केला. आपणास दोघाना संतती नाही. तरी संतती होण्यास काय उपाय करावे. धाकटा भाऊ खेमगावाडा यांनी सांगितले की, श्री शंकराची भक्ती केली तर आपणास कन्या किंवा पुत्र प्राप्ती होईल.
असा शब्द ऐकल्यावर धाकटा बंधू यांनी सांगितले, तुम्ही राज्य करा मी श्री शंकराची भक्ती करून कन्या किंवा पुत्र घेउन येतो. धाकटा भाऊ खेमगावाडा भक्ती करण्यास अरण्नयात श्री शंकराचे मंदिर पाहिल्यावर जुनी पुजा उतरुन, नविन पुजा करुन एका पायावर उभे राहून बारा वर्षे केली, त्या वेळेस देव प्रसन्न होऊन काय मागायाचे ते माग. राज्यानी सांगितले कन्यारत्न पेटीत घालून तुझ्या खांडवनात सोडून देइल, देवाचा शब्द ऐकून राजा आपल्या नगरात निघून गेले.
राजाचा हेतू पुर्ण करण्यासाठी श्री शंकराने आपल्या जटातुन गंगा काढली व तिच्या मस्तकी हात ठेऊन अद्यान कन्या केली, ती कन्या पेटित घालून बानासुरास बोलावून घेतले, तुम्ही पेटी घेउन चंदनपुरी नगराजवळ खांडवनात पेटी सोडून यावे. बानासुराने सांगितले मी पेटी सोडून येईल परंतू इच्या अगोदर माझे नांव निघाले पाहिजे. तरी देवाने सांगितले तुझ्या नावावरुन इचे नाव बानु ठेवतील.
बानासुराने पेटी डोक्यावर घेउन चंदन पुरीच्या खांड वनात पेटी सोडून बानासुर स्वर्गात निघून गेले, चंदनपूरचे राजे मेंढ्या घेउन त्यांचे नोकर मेंढ्या चारन्यास खांडवनात गेले असता, त्यांना ती पेटी दृष्टीस पडली, ती पेटी घेउन राज्याच्या स्वाधीन केली. दोघा भावांनी पेटी उघडून पाहिली असता पेटिमध्ये कन्यारत्न दिसले, कन्या पाहतांनी दोन्ही भावास आनंद झाला, राज्यानी ब्रम्हाणास बोलावून कन्याचे रास नांव गंगा व बोलावते नांव बानू ठेवले, तरी बानुचा संभाळ करीत असतांनी बानु कन्या बारा वर्षाची झाली. बानुबाईने मातेचा विचार घेउन, घागर घेउन गिराणा नदीवर गेली, बानुबाईने गिराणा नदीवर मातीचे एक शिवलिंग तयार केले आणि श्री शंकराची मनोभावे भक्ती करू लागली. तिची भक्ती पुर्ण होताच स्वर्गात घंटा वाजू लागली, श्री शंकराने नारद स्वामीस बोलावून विचारले घंटा वाजन्याचे कारण काय नारादस्वामी देवास सांगू लागले. चंदनपुरी बानू ताईची भक्ती पुर्ण झाली म्हणून घंटा वाजली. देवाने नारद स्वामीस सांगितले की, चंदनपुरी येथे जाऊन बनुताईच्या मनाचा हेतू पुर्ण करुन माघारी यावे. देवांनी सांगितल्याप्रमाणे नारादस्वामी चंदनपुरीस आले. बानूताईने नारादस्वामी पाहताच आनंद झाला. नाराद स्वामीने बानुताईस विचारले, आपण भक्ती कशासाठी करीत आहे. तेव्हा बनुताईने नाराद स्वामीस सांगितले, मी भ्रतरसाठी भक्ती करीत आहे. नारद स्वामीने विचारले आपणास भ्रतार कोणत्या प्रकारचा पाहीजे. बानुबाई म्हणु लागली मला भ्रतार अग्नीत टाकला तर न जले, पान्यात टाकला तर न बुडे, शास्त्रनानी तोडला तर ना तुटे, असा माझ्या मनासारखा भ्रतार पाहिजे. नारद स्वामी बनुताईस म्हणु लागले तुम्हास तुमच्या मनाप्रमाने भ्रतार आहे, पण एक सवत आहे, ते मला मान्य आहे. तरीपण मला भ्रतार असाच मनासारखा पाहिजे. नारद स्वामी सांगू लागले पुण्याच्या पलीकडे त्रिकोण डोंगरामध्ये मल्हार म्हाळसा राज्य करतात, त्या ठिकाणी तुमच्या मनासारखा भ्रतार आहे. बानुबाई नारदास म्हणु लागली मी खान्देशात देव पुण्याच्या पलीकडे त्रिकोण डोंगरावर त्या ठिकाणी कसे जावे, व देवास मोहिनी रुप कसे दाखवून यावे. नारादस्वामी बनुताईस म्हणु लागले तुम्ही मानवात जन्म घेतला, त्यामुळे आमची वस्तु तुमच्या जवळ देता येत नाही. बानुबाई नारदमुनीस म्हणु लागली मी मानव लोकांत जरी जन्म घेतला, तरी में मानव लोकाची होईल अशी गोष्ट कदापि होणार नाही. नारादस्वामीने बानुबाईचे शब्द एकल्यावर सांगितले या माझ्या पायातील खडवा तुमच्या स्वाधीन करतो, आपण खाडवावर स्वार होउन जेजुरीस जाउन देवास मोहिनी रुप दाखवून परत यावे. माझ्या खडवा माझ्या स्वध्यान करावे.
बानुबाई हातात खडवा घेउन चंदनपुरीच्या शिवावर आली खडवास उध्दुप लाउन खडवावर स्वार होउन वायु वेगाने जेजूरी गडावर आली. बानुबाई मनात विचार करत होती की, जेजूरी गडावर आले परंतू देव या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेत आहेत. आपण देवास हाक मारुन देवास सावध करावे, व देवास मोहिनी रुप दाखवून परत माघारी निघुन जावे. बानुबाईने देवास हाक मारल्यावर देव सावध झाले. देवाने बानुबाईचे रुप पहाताच देव भुलून गेले. देवांनी बनुबाईस विचारले, आपण कोणाची कोण इथे कशासाठी आली मला सांगा, बनुबाई देवास बोलू लागली मी तुमच्या दर्शनासाठी आले आहे. देव बोलू लागले तुम्ही दर्शनास आले तर, दर्शन करा व परत माघारी जावे. बानुबाई देवास बोलू लागली – जन जमासारखे माझे दर्शन नाही, मला तुमची चतुर्भुज भेट पाहिजे. देवाने बनुस सांगितले की, जो माझी एकनिष्ठ भाव धरून मनोभावे भक्ती करील मी त्यांना भेट देतो. इतरांना भेट देण्याचा अधिकार नाही. बानुबाई देवास विचारले आपण झोपेत किंवा जागे असावे, देवानी सांगितले कि मी नेत्री झोपी अ हृदयात जागा असावे, याचे करण मला झोप लागली तर, या तिन्ही लोकात झोप लागेल म्हणून मी नेत्री झोपी व हृदयात जागा आहे. बानू देवास बोलू लागली तुम्ही डोळे उघडून एकवेळेस माझ्याकडे पहावे. देवानी डोळे उघडल्याबरोबर बानुबाईचे लावण्य सुंदर रुप पाहून देव भुलून गेले. देव बानुबाईस बोलू लागले, आपण माझ्या जीवासाठी आलात तरी एक वेळ माझ्या पलंगावर यावे, बानुबाईने देवास उत्तर दिले, ही बानू फुकटची नाही. तू येथील चंदनपुरी संभाळशील मेंढर, कोकरी, खाशील शिळ्या भाकरी, करशील बारा वर्षे चाकरी, तर तुझी बानू, जाते आता माघारी, देवाने बानूबाईस सांगितले वेडा तरवडा हाती लागेल थोडा नाहीतर घालील सर्व पृथ्वीला वेढा, माझ्या हातुन बान गेल्यावर हा देह कशाला ठेवावयाचा, बानुबाई मनात विवार करु लागली. देव झोपेमध्ये आहेत जर सावध झाले तर माझे मनगट धरल्यावर माझा काहीच विलाज चालणार नाही. बानुबाईने मोहिणी रुप काढून घेतले, व खडवावर स्वार होऊन चंदनपुरीस निघून गेली.
जेजूरी गडावर देवाने बानूचे रुप पाहून, वेड्या सारखे खांबाला धरून बानू बानू करु लागले. म्हाळसाबाई गडावर येऊन पहाती तर देव वेड्या सारखे बानू बानू करीत आहे. म्हाळसाबाई देवास विचारू लागली. तुम्ही सारखे बानू बानू करीत आहात, तरी ही बानू होती तरी कोणाची, आणि इथे कशा करिता आली होती देवाने म्हाळसाबाईस सांगितले बानू धनगराची असून, ती माझ्या जीवासाठी इथे आली होती. म्हाळसाबाई देवास बोलू लागली देवा, ही बानू नाही तुम्ही हातामध्ये खांब धरून वेड्यासारखे बानू बानू कित आहात. तरी आपण डोळे उघडून पहावे. देवाने डोळे उघडल्यावर हातात खांब दिसला. देवाने सांगितले माझी बानू तुम्ही काढून दिली. म्हाळसाबाईने सांगितले तुमची बानू आम्ही काढून दिली नाही. दोन्हीचे भांडण चालू असतांनी देवास फार राग आला, देवाने हातात खडूखंडा घेऊन म्हाळसाबाईस मारण्यास धाऊन गेले. म्हाळसाबाई पुढे पळती, देव तिच्या मागे लागले, म्हाळसाबाई त्या दगडाच्या शिळेआड लपून बसली. देव तिच्या मागे पळत असतांना त्या शिळेजवळ आले म्हाळसाबाईस मारण्यास जातांना तो खंडा म्हाळसाबाईला न लागता दगडाच्या शिळेवर टोला मारला. तरी ती दगडाची शिळ दोन भाग झाली आहे. देवास फार राग आला. म्हाळसाबाईस बोलू लागले, जारणी, आभागणी, मल्ली मल्ल दोन्ही दैत्य माजले होते. त्यांना मारण्यास गेलो. तरी माझा हात खाली गेला नाही. तुला मारण्यास जातानी माझा हात खाली गेला. धिक्कार असो तुझा. म्हाळसाबाई मंदिरात निघून गेली, देव गडावर निघून गेले. देवानी स्थान व भोजन करण्याचे सोडून दिले. तिन दिवस होऊन गेले देवास स्थान नाही, भोजन नाही. स्वर्गात नारद स्वामीस समजले, नारद स्वामी यांना तिन्ही लोकात काय चालते हे समजत होते. स्वर्गात काही कळ असेल, तर नारद स्वामीची शेंडी फुरफुरावी, मानव लोकात काही कळ असेल, तर नारद स्वामीचे पोट गडगड करावे. पातळात काही कळ असेल तर नारद स्वामी पाय खाजवावे. नारादस्वामीने विचार केला, मानव लोकात खंडोबा देवाचे व म्हाळसाबाईचे भांडण झाले. तरी अजून अपुरीच कळ आहे. संपुर्ण कळ लाविल तरच नावाचा नारद होईल, नारद स्वामी खडवावर स्वार होऊन जेजूरी येथे म्हाळसाबाईच्या मंदिरात आले.
नारद स्वामी पहाताच म्हाळसाबाईला आनंद झाला. म्हाळसाबाईने विचारले, आज इकडे काय येणे केले. पलंगावर नारद स्वामी बसले, नंतर म्हाळसाबाईस विचारले आज तुमचा महाल मला सुना सुना दिसत आहे. नारद स्वामी मी आज रविवार दिवस असुन सडा सातवन मंदिरासमोर चांगल्या प्रकारच्या रांगोळ्या घालून पलंगावर फुलाची शेज करून ठेवली. नारद स्वामी म्हणू लागले, एवढी चांगली शेज केली. पण या ठिकाणी देव नाही. म्हणून मला तुमचा महाल सुना दिसत आहे. यामुळे म्हाळसाबाईस राग आला- नारद स्वामीस म्हणू लागली, देवाचे नाव माझ्यापुढे काढू नका, कारण धनगराची कोण बानू आली, तिला पाहिल्यावर देव भुलून गेले. आज तिन दिवस होऊन गेले. देवास स्थान नाही. भोजन नाही. देव सारखे बानू बानू करीत आहे. नारद स्वामी म्हणाले, तुम्ही त्यांना काहीतरी समजून सांगायचे होते. म्हाळसाबाई म्हणाली मी त्यांची पुष्कळ विनंती केली तरी देवाने ऐकले नाही. नारद स्वामी म्हाळसाबाईस बोलू लागले, मी देवाकडे जाऊन देवाला इकडे घेऊन येतो. म्हाळसाबाई नारद स्वामीस सांगू लागली देवाने मला सांगितले तुझे तोंड पहाणार नाही. तरी देव माझ्याकडे येणार नाहीत. नारद स्वामीने सांगितले मी पैज लावण्याचे सांगून देवास या ठिकाणी घेऊन येतो. तुम्ही दोघांनी सारीपाट खेळावे. म्हाळसाबाईने तिन डावामध्ये देवास जिंकले तर देवानी राज्यावर तुळशीपत्र ठेवून बारावर्षे वनवासात जावे. जर देवानी म्हाळसाबाईस जिंकले तर म्हाळसाबाईने कच्च्या घागरीने पाणी आणावे. व देवाची घर बसल्या बानू आणून द्यावी. अशी पैज लावून देव घेऊन येतो. नारादस्वामी जेजूरी गडावर गेले. पहातात तर देव सारखे बानू बानू करीत आहे. नारद स्वामीने देवास हाक मारताच देव जागे झाले. नारद स्वामी पहाताच देवास आनंद झाला. देवाने नारद स्वामीस पाटावर बसण्यास जागा दिली. नारादस्वामी देवास विचारु लागले. आज तुमचा मुखचंद्र फारच उतरलेला दिसतो. देवानी सांगितले काल अरण्यात शिकारीस गेलो होतो, डन्हामुळे माझ्या मुखचंद्र उतरला आहे. तरी बरे असो आज म्हाळसाबाई या ठिकाणी दिसत नाही, असे नारद स्वामींनी देवास विचारले, देवानी सांगितले धनगराची कोण बानू आली. ती त्यांना पाहवली नाही, तरी त्यांनी माझ्या हातातली बानू काढून दिली. नारादस्वामी देवास म्हणू लागले, चला म्हाळसाबाईने तुम्हास मंदिरात बोलाविले आहे. देवाने सांगितले तिचे तोंड सुद्धा पहावयाचे नाही, तर तिच्या महालात जायाचे कशाला. नाराद स्वामीने देवास सांगितले मी पैज लावण्याचे सांगून आलो आहे. ती पैज अशी तुम्ही दोघांनी सारीपाट खेळावे, सारीपाट खेळतांना तिन डावामध्ये म्हाळसाबाईने तुम्हास जिंकले तर तुम्ही राज्यावर तुळशीपत्र ठेऊन, बारा वर्षे वनवासात जावे. जर तुम्ही तिन डावामध्ये म्हाळसाबाईस जिंकले, तर म्हाळसाबाईने कच्च्या घागरीने पाणी आणावे, व तुमची बानू घर बसल्या आणून द्यावी. नारादस्वामीचे असे शब्द ऐकताच देव म्हाळसाबाईच्या महालात आले. नारद स्वामी दोघांची कळ लावून निघून गेले. देव म्हाळसाबाई सारीपाट खेळायला बसले. सारीपाट खेळतांना म्हाळसाबाई कपट रुपाने डाव टाकून तिन डावामध्ये देवास जिंकून घेतले. म्हाळसाबाईने देवाचे कपडे काढून घेतले, व देवास गडावरुन खाली काढून दिले. गडाच्या पायथ्याशी देवाची हेगडी प्रधानाची भेट झाली. देवाने हेगडी प्रधानास सांगितले, तुम्ही गडावर जाऊन म्हाळसाकडून माझे कपडे घेऊन यावे. हेगडी प्रधान गडावर म्हाळसाबाईच्या महालात आले. म्हाळसाबाईस बोलू लागले, देवाचे कपडे माझे स्वाधीन करा, मी देवाच्या अंगावर कपडे घालून देवास अरण्यांत शिकारीस नेतो व परत गडावर देवाला घेऊन येतो. तेव्हा म्हाळसाबाईने कपडे दिल्यावर हेगडी प्रधान कपडे घेऊन देवाजवळ आले. व ते देवांनी घातले. देव प्रधानजीस म्हणाले, आता बाजूच्या देशाला जाऊ, बारा वर्षे करुन बानूला गडजेजुरीला घेऊन येऊ. देवाने सैन्यास हुकूम केला. सैन्य घोडयावर स्वार झाले. नगरात नौबद नगरे वाजू लागले. म्हाळसाबाईने आवाज ऐकल्यावर दासीला विचारले, आवाज कशाचा येतो. दासीने सांगितले देव सैन्य घेऊन खान्देशात बानूस आणण्यास निघाले, तेव्हा नगरामध्ये चौघडा, नगारे वाजत आहे. तेव्हा म्हाळसाबाई दासीला म्हणाली आपण महालावर जाऊन देवाने किती फोज चालवली ते पाहू चला, फौज पाहिल्यावर म्हाळसाबाईस राग आला, देव चंदनापुरीस बानू आणण्यास जाऊ नये म्हणून देवास अपशकून करण्याच्या हेतूने म्हाळसाबाईने तिन दासींना बोलवून घेतले. त्यांना सांगितले की, १) पहिला दासीने रिकामी घागर घेऊन देवास आडवे जावे २) दुसऱ्या दासीने सरपणाची मोळी डोक्यावर घेऊन देवास आडवे जावे ३) तिसऱ्या दासीने गौऱ्यांची पाटी डोक्यावर घेऊन देवास आडवे जावे. म्हाळसाबाईने सांगितल्याप्रमाणे त्या तिन्ही दासी देवास अपशकून होण्यासाठी देवास आडव्या गेल्या. त्या तिन्ही स्त्रिया देवास आडव्या जातांना हेगडी प्रधानांनी पाहिल्यावर देवास सांगितले आपणास अपशकून झाला चला माघारी जाऊ. देवाने प्रधानजीस विचारले आपणास काय असा अपशकून झाला म्हणून माघारी जायचे. हेगडी प्रधानजीने सांगितले रिकामी घागर, सरपणाची मोळी, व गौऱ्याची पाटी कधी ही आडवी जाऊ नये. तेव्हा देवाने प्रधानजीस मागे पहाण्यास सांगितले, प्रधानजी मागे पहात असतांना देवाने भंडार हातात घेऊन त्या तिन्ही स्त्रीयांच्या अंगावर टाकला भंडार तिघीच्या अंगावर पडल्यानंतर रिकामी घागर पाण्याने भरली. सरपणाची मोळीचे ऊस झाले. पटीतील गौऱ्यांच्या कडकण्याझाल्या, असा चमत्कार पाहून तिन्ही स्त्रिया देवाजवळ आल्या.
१) पहिली स्त्री देवास म्हणाली माझी रिकामी घागर होती, ती पाण्याने भरली. २) दुसरी स्त्री- देवास म्हणाली माझी सरपणाची मुळीचे ऊस झाले. ३) तिसरी स्त्री- देवास म्हणाली माझी गौऱ्यांची पाटी असतांनी त्यांच्या कडकण्या झाल्या, तरी आम्हा तिघींचा उध्दार करावे. देवाने सांगितले कलीयुगात भक्तजन लग्न कार्य करतील त्या नंतर माझी गादी स्थापन करतील, त्या गाडीवर घट मांडतील, घटाच्या वर पाच ऊस उभे करतील, त्या पाच ऊसास पाच कडकण्या बांधतील, त्या वेळी तिघींचा उद्धार होईल. त्या प्रमाणे तिन्ही स्त्रीयांचा उद्धार होईल देवाने केला. कलीयुगात भक्तजनासाठी देवाने जागरण घालण्यची प्रथा केली, देव हेगडी प्रधानासह सैन्य घेऊन पवित्र कऱ्हागंगेजवळ आले. तरी कऱ्हागंगेने देवास पहाताच स्त्रीरुप धारण करुन, देवा समोर हात जोडून उभी राहीली व देवास म्हणाली तुम्ही जेजूरी गड सोडून खान्देशात चंदनपुरीस चालले. तरी मला मान देऊन जावे. तेव्हा देवाने कऱ्हागंगेस सांगितले कलीयुगामध्ये माझे भक्तजन माझ्या दर्शनास येतील. त्या वेळेस प्रथम तुझ्या पवित्र पाण्याने स्नान करतील. त्या ठिकाणी नैवद्द्य करुन तळी भंडार करतील हा कऱ्हागंगेस मान देऊन चंदनपुरीचा मार्ग धरला, पुढे भूलेश्र्वर मैदानात आले. तेथे भूलेश्र्वर भक्तांनी देवास पाहिल्यावर आनंदीत होऊन देवाचा मानसम्मान केला व भूलेश्र्वर भक्त देवास म्हणाला तुम्ही खान्देशात गेल्यावर मी येथे कोणाची भक्ती करावी. तेव्हा भक्ताची विनंती ऐकून भक्तासाठी भूलेश्र्वर या नावाने लिंगाची स्थापना केली, नंतर चंदनपुरचा मार्ग धरला, पुढे चालतांनी लोणी धामणी या गावी देव आले. त्या गांवी देवाचा महान भक्त होता. त्याचे मनोकामना पुर्ण करण्यासाठी त्या गावी लिंगरूप स्थापना केली, पुढे दावडी निमगांव या गावी देव आले. दावडी देव. देव विश्रांती करु लागले हे हेगडी प्रधानाच्या लक्षात येताच प्रधानाने विचार केला. आपण देवास बाजूच्या देशात नेले तर म्हाळसाबाई मला शाप दिल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे हेगडी प्रधान गुप्त रुपाने जेजुरी गडावर गेले तेथे भंडार खाण्यात श्री कृष्णाची मुलाली पाहिली प्रधानाने मुरलीच्या मस्तकावर हात ठेऊन तिची कन्या बनविली ती कन्या घेऊन दावडी गावी आले. त्यावेळेस देव सावध झाले तेंव्हा प्रधानाने देवास विचारले देवा सावध झाले तेंव्हा प्रधानाने देवास विचारले देवा आपण कोणत्या ठिकाणी चाललो. देवाने सांगितले आपण सांगितले आपण खान्देशात बानुस आणण्यास चाललो. परंतु प्रधान म्हणाले बाजुस पाहीली ती चंदनपुर सोडून आपल्याबरोबर आपल्यासमोर उभी आहे. देवाने तिच्याकडे पाहिल्यावर प्रधानजीस सांगु लागले तुम्हास वाटते देव बानु बानु करतात तेंव्हा इला पाहून देव भुलुन जातील अशी गोष्ट होणार नाही. या मुलीची कथा अशी आहे. मी दुसरा धारण करुन मल्ली मल्ल दैत्याचा संहार करुन पंचाळा पर्वतावर जाऊन बसले त्या वेळेस श्री कृष्ण व बळीराम दोघे दोघे भाऊ माझे दर्शनास आले परत फिरतांना बळीराम श्री कृष्णास म्हणू लागले देवाचे दर्शन घेण्याच्या अगोदर देवाच्या पायावर सुपारी किंवा पैसा ठेवा लागतो. श्री कृष्णाने सांगितले माझ्या जवळ सुपारी व पैसा नाही तेंव्हा बळीसा श्री कृष्णास म्हणाले, आता इथुन पुढे तुम्हास बौध्द अवतार धारण करावयाचा आहे. तरी तुमच्या हातातील मुरली देवाच्या पायावर ठेवावी. तेंव्हा श्रीकृष्णाने ती मुरली माझ्या पायावर वाहीली ती मुरली मी भंडार खान्यात टाकुन दिली. तुम्ही गुप्त रुपाने जेजुरी गडावर जाऊन त्या भंडार खान्यातून मुरली काढली तिच्या मस्तकी हात ठेऊन तिची कुमारीका कन्या बनवून माझ्या समोर उभी केली. तरी या मुरलीच्या धिक्कार असो. तेंव्हा मुरली देवा सांगु लागली देवा आजपर्यंत मी भंडारखान्यात होती. तरी माझी उध्दार होण्याची वेळ आली असता तुम्ही माझा धिक्कार केला तरी माझा उध्दार करावे. देवाने मुरलीस माझी स्थापना ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुला गायन करण्याचा अधिकार राहील परंतु या दावडी गावच्या ठाण्यावर तुला गाण्याचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे दावडीच्या खंडोबा देवास मुरळी चालत नाही (मुरलीची मुरळी) देवाने दावडी गांवी स्थापन करुन चंदनापुरीच्या मार्ग धरला पुढे चालतानी शिंगी पारगावच्या शिवारात आल्यावर भक्तासाठी देवाने लिंगाची स्थापना केली. तेथून पुढे स्थापलिंग गावचे नाव पडले पुढे देवाने चंदनपुरीच्या मार्ग धरुन चालले पुढे चालतानी वाकडी दंडक अरण्यांत आले. कडक उन्हाळा असल्यामुळे सर्व झाडाचे पाने गळून पडली होती. विश्रांतीसाठी देवास झाडाची सावली दिसत नव्हती. देवाने हातात भंडार घेऊन सौंदडीच्या झाडावर टाकला त्या झाडावर भंडार पडताच ते सौंदडीचे झाड हिरवेगार झाले.
प्रधानाने हातात झारी घेऊन शोध करीत चाललो हेगडी प्रधान भेट चंदनापुरीस जाऊन बानुबाईचे घरी जाऊन म्हणाले आम्हास पाणी द्यावे. बानुबाईने हेगडी प्रधानास विचारले आपले नाव काय, आपले गाव काय कोणते, आपण आले कोठून आणि जायचे कोठे ते मला सांगावे हेगडी प्रधान बानुबाईस सांगु लागले. जेजेवाडी आमचे गांव, खंड्डू गावडा माझ्या मालकाचे नाव, त्याचा मी प्रधान असुन तुमच्याकडे पाणी घेण्यास आलो आहे.. तेंव्हा बानुबाईने मनोमन ओळखुन घेतले प्रधानाने आणलेली झारी आपल्या मालकास द्यावी. प्रधानजी दोन्ही झाऱ्या घेऊन देवा जवळ आले. पाण्याची झारी देवाच्या देवाच्या स्वाधीन केली. पाणी पिऊन देव शांत झाले. प्रधानच्या झारी पहातांनी देवाने प्रधानास विचारले आपण ही दुसरी झारी कोणाची आणली त्या वेळेस प्रधानाने सांगितले आपण त्या ठिकाणी चाललो आहे. तरी बानुबाईची दुधाची झारी असावी. देवास खुण पटल्यावर प्रधानास सांगितले. तुम्ही सैन्य घोडेस्वार होऊन परत माघारी जेजुरी गडावर जावे. इथून पुढे तर एकटा चंदनपुरीस जाऊन बानुच्या घरी बारावर्षे चाकरी करुन बानुस गड जेजुरी गडावर घेऊन येतो. देवाचे शब्द ऐकून प्रधान व त्यांचे घोडे स्वार झाले जेजुरीस जाण्यास परत माघारी घोडे वळविले. या ठिकाणी देवानी घोडयास शेंदूर लावून घोडयाची स्थापना करुन परत माघारी जाण्यास सांगितले. या ठिकाणी ठिकाणी घोडयाच्या वाकडया माना झाल्या म्हणून गावाचे नाव वाकडी पडले. आजपर्यंत कोणत्याही ठिकाणी खंडोबा देवास शेंदूर दिसत नाही फक्त वाकडी गांवीच खंडोबा देवाला शेंदूर लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. वाकडी गावी देवानी घोडयाची स्थापना करुन एकटेच चंदनपुरीस चालले. देवाच्या हातामध्ये खंडा (मोठी तलवार) असतांना देवाने विचार केला. आपणास बानुच्या घरी बारा वर्षे चाकरी करावयाची आहे. तरी या तलवारीचा उपयोग होणार नाही. पुढे चालतांनी श्री क्षेत्र पुणतांबा या गावी गोदावरी गंगेच्या तिरावर आले. देवाने हातात खंडा धरुन गरागरा भिरकावून गोदावरी गंगेच्या पात्रात फेकून दिला. त्या ठिकाणी डोहाला भिरकुन डोह नाव पडले.
पुढे काही दिवसांनी पुणतांबा येथील शेतकऱ्यास गोदावरी गंगेच्या पात्रात देवाच्या हाताला खंडा भिरकून डोहात सापडला त्यांनी पुणतांबा गावामध्ये खंडा आणून त्यांची पुजा आरती करुन सेवा करु लागले. देवाने गोदावरी गंगा पार करुन चंदनपुरीस चालले. चंदनपुरी गांव जवळ येताच देवाने वयोदृध्द रुप करुन चंदनपुरीस आले. पारावर धनगर मंडळी बसली होती. देवानी त्यांना रामराम केला. धनगरांनी देवास विचारले तुमचे नाव गाव सांगावे, तुम्ही कोठून आलास, तुम्हास कोठे जायाचे आहे. देव धनगरास सांगु लागले जेजेवाडी आमच गाव, खंडू गावडा माझे नाव आमच्या देशात दुष्काळ पडला म्हणून पोट भरण्यासाठी तुमच्या खान्देशात आलो. तुम्ही मला कामावर ठेवा मी कामास राहिल्यावर माझ्या पोटाला अन्न मिळेल व माझे समाधान होईल. तरी धनगरांनी देवास विचारले आपण महिन्यास काय घेताल. देवानी सांगितले पोटाला अन्न, वस्त्र आणि पायाला पायतण मिळाले तर माझे तर माझे काम होईल. धनगर मंडळीने देवास विचारले तुम्हास सकाळी, दुपारी व सायंकाळी किती अन्न लागेल ते आम्हास सांगावे. देवानी त्यांना सांगितले सकाळी एक खंडी, दुपारी दीड खंडी, सायंकाळी सव्वा खंडीचा घाटा व एक खंडीची भाकर असली तरी चालेल. तरी माझे पोट भरत राहील, त्यांचा शब्द ऐकल्यानंतर आपल्या घरी एवढे अन्न देण्याची ताकत नाही. धनगराने विचार करुन सांगितले आमच्या गावात बानुबाई आहे. त्यांचेकडे तुम्ही कामास राहावे. देवाने बानुबाईच्या घरी असलेले मेंढ्या चरणारे नोकर यांच्यावर देवाने भंडार फेकुन दिला. भंडार अंगावर पडताच सर्व मेंढके बानुबाईस सांगुन आपआपल्या घरी निघून गेले. गावांतील धनगर मंडळी जमवून बानुबाईच्या घरी आले. तिला सांगु लागले आपल्या गावांत परगांवाचा माणूस काम पहाण्याकरीता आलेला आहे. तो कोणाच्या ही काम करण्याची वाट पहात आहे. बानुबाईम्हणाली चला कोणत्या ठिकाणी बसलेला आहे. तेव्हढा मला दाखवा धनगर बानुबाईस घेऊन लेंड्यापारावर आले. देवाने तिला पहाताच आनंद झाला. बानुबाईस देवास म्हणू लागली माझ्या घरी मेंढ्या सांभाळण्यास राहावे. तुमची अन्न वस्त्राची सर्व व्यवस्था करीन.
बानुबाईने देवास आपल्या घरी आणुन जेवण घातले. देवाने बानुबाईस सांगितले तुम्हाला माझ्या देशातील चालीरीती कराव्या लागतील. बानुबाईने देवास विचारले तुमच्याकडे कोणत्या चालीरीती आहे. ते मला सांगा मी करण्यास तयार आहे. देवाने सांगितले तुझे गण, गोत्र इस्टमित्र, भाऊबंद यांना लेंड्या पारा जवळ जमा करावे. त्यांचा मुठमूथ लेंड्या द्यावे. आपण दोघांना लेंड्या पारावर उभे करावे. मध्ये आडवी जमणुका धरावी. तू माझ्या हातात हात द्यावे मुठ मुठ लेंड्या आपल्या अंगावर टाकाव्या व त्यांनी तडा तडा टाळ्या वाजवाव्या म्हणजे पक्का गडी झाला बानुबाई बोलू लागली तू तर लग्न लावण्यास पहातो. देवानी सांगितले बिगर ब्राम्हणाचे लग्न लागत नाही. बरे असो तुझी काय असेल ती चाल रीत कर आणि कामाला लाग. देवानी सांगितल्या प्रमाणे बानुबाईने सर्व गोत्र लेंड्या पारावर जमा केले. त्यांचा हातात मुठ मुठ लेंड्या दिल्या. देव व बानुबाई पारावर उभे राहिले. आडवी जमनुका धरली, बानुबाईने देवाच्या हातात हात दिले. बिगर ब्राम्हणाचे लग्न लावण्याची वेळ आली म्हणून स्वर्गात घंटा वाजला तरी तेंव्हा सर्व देवानी पुष्प अक्षता हातात घेतल्या. ब्रम्हदेव मंगलाष्टक बोलू लागली. मंगलाष्टक पुर्ण होताच दोघाची गाठ बांधली. त्या प्रमाणे देव बानुबाईच्या घरी नोकरीस राहिले व मेंढ्या चारू लागले एके दिवशी बानुबाईने देवास हाक मारली व म्हणाली आज मेंढ्या गिरणा नदीवर नेऊन सर्व मेंढ्या धुवून धुवून काढा. तो पर्यंत मी तुझ्या भाकरी घेऊन येते. देव सर्व मेंढ्यांसह गिरणा नदीवर आले. देवाने चमत्कार केला. देवचतुर्भुज नारायण झाला. एकेएक मेंढी धरून खडकावर आपटून सर्व मेंढ्या मारून त्यांचे कातडे काढून त्याचा ढिक केला. आतड्याचे गंज घातले मुंडक्याचा पारा बांधला त्यावर बसून काड्याचे निशान लावले व देव बानुबाईची जेवणासाठी वाट पहात बसले. घरामध्ये दासींना हाक मारून सांगितले आपल्याला गिरणा नदीवर खंडू गावड्याची भाकरी घेऊन जायचे आहे. बानुबाई भाकरीची पाटी डोक्यावर घेऊन गिरणा नदीजवळ आली. गिरणा नदीत लाल पाणी पहाताच दासीस विचारु लागली दासी गिरणा नदीत लाल पाणी कशाचे वाहत आहे. दासीने सांगितले रंगाऱ्याने लाल रंगाचे कपडे धुतले. त्याचे लाल पाणी वाहत आहे. पुढे चालतांना आतडे, कातडे वहातांना पाहिले बानुबाई दासीस म्हणाली हे काय वहात आहे. तेव्हा लांडग्याने मेंढरू किंवा कोकरू मारले असेल ते घारीने चोचीत धरून आकाशात गेली असेल घारीच्या तोंडातून निसटून ते पाण्यात तेंव्हा हे कातडे वहात आहे. पुढे चालतांना डोंगरासारखा मासाचा ढीग पाहिला. तेंव्हा तिची तळपायाची आग मस्तकाला गेली व मोठमोठ्याने शोक करु लागली देवानी बानूबाईस विचारले तू का शोक करीत आहे. तिने सांगितल्या माझ्या सर्व मेंढ्यांचा प्राण घेतला तेंव्हा मी शोक करीत आहे. तरी माझ्या मेंढ्या उठवल्याशिवाय तूला भोजन मिळणार नाही. तेंव्हा देवाने हातात भंडार घेऊन सर्व मासावर आतड्यावर टाकताच सर्व मेंढ्या जिवंत झाल्या तेंव्हा तिने देवाला भोजन दिले. एके दिवशी बानुबाईने देवास सांगितले मी घागर पाण्याने भरून घेऊन येई पर्यंत तुम्ही घोंगडी विणून ठेवावी. बानू पाणी आणण्यास गिरणा नदीवर गेली. ती येई पर्यंत देवाने तिला पाणी आणण्याचे अगोदर घोंगडी विणून ठेवली. बानुबाईने घोंगडी पाहिल्यावर देवास म्हणू लागली आज पंबरपुराचा बाजार आहे. तेंव्हा घोंगडी घेऊन बाजारात जाऊन विकून ये. तेंव्हा बानुबाई दासीला बरोबर घेऊन पंबरपुराच्या बाजारात आली, घोंगडी घेऊन विण्यासाठी बाजारात बसली. घोंगडीची किंमत नऊरत्न सांगितले कोणी गिऱ्हाईक घोंगडी घेईना. देवाला चाकरी करतांना बारा वर्षे होत आले. तरी आपणास बानु ओळख देत नाही. तरी आपण सर्व मेंढरे कोकरे वाडग्यात कोंडून ठेवल्या व देवाने रुप बदलून तारुण्य घेतले व घोड्यावर स्वार होऊन पंबरपुराच्या बाजारात गेले व बानुस विचारु लागले या घोंगडीची किंमत काय आहे. तिने सांगितले घोंगडीची किंमत नऊ रत्न तुला असल तर घेण नाहीतर घोंगडी देते लोटून देवाने सांगितले तुझ्यासगट घेईल तेव्हा बानुस राग आला. देवास वाईट शंब्दाने बोलू लागली ते शब्द ऐकून देवाने सांगितले बारा वर्षे तुझ्या सांगितल्याप्रमाणे चाकरी करण्यास झाले अजुनही तू मला ओळख देत नाही. तरी आता तुला घोडयावर बसवून घेऊन गड जेजुरीला नेईल.
तेंव्हा बानुबाईने सांगितले माझ्या गावाहून मला घेऊन चला, नाही नेलेत तर माझे गणगोत माझेसाठी वेडे होतील. देवाने बानू घोडयावर बसवून चंदनपुरी नेली. तिच्या गणगोत्यांची भेट घेऊन त्यांचा निरोप घेतला व घोडयावर बसूंन जेजुरीस आले. देवाने म्हाळसाबाईच्या भांडणाच्या धाकामुळे बानुबाईस गडाच्या खाली डोंगराच्या गुहेत ठेवली. देवाने बानुबाईस सांगितले, चैत्र पौर्णिमा, महाशिवरात्र, चंपाषष्टी, सोमवती अमावस्या या उत्सव काळात तुझ्या अंगावर गुप्त रितीने भंडारा टाकीत जाईल व देव आणि म्हाळसाबाई गडावर आनंदाने राहू लागले.
आपली देणगी आपण आमच्या महाराष्ट्र बँकच्या खात्यात जमा करू शकता, खाते क्रमांक: ६०१७४८७६१०७ आणि आयएफएससी: MAHB००००८७२.
संपर्कासाठी खालील माहिती भरा.
०२४२२-२५६५५५
+९१-९४२२५३९७६६
mail@khandobawakadi.org
मु.पो. वाकडी(खंडोबाची), तालुका-राहता, जिल्हा अहमदनगर, पिन-४१३७१९